Sunday, June 19, 2011

अंजनामाता वही

श्रद्धावानांनो, सदगुरू श्री अनिरुद्धांनी स्वतः तयार केलेली, विशिष्ट रचना असलेली, श्री वरदा चंडिका प्रसन्नोत्सवात सिद्ध झालेली, अकरा दिशांनी संरक्षण देणारी व वामलता (दुष्प्रार्ब्धाचा) नाश करणारी 'अंजनामाता' वही लिहून सदगुरु कृपेचा लाभ घेऊया.

'अंजनामाता' वहीचे महात्म्य समजून घेण्याआधी आपण 'स्वाहा' आणि 'स्वधा' म्हणजे काय ते सजून घेवूया. हि दोन्ही नामे त्या चंडिकेचीच.
'स्वाहा' कार म्हणजे परमेश्वराला अहंकार न बाळगता जे अर्पण करायचे किंबहुना अहंकार सुद्धा ज्या शब्दाने अर्पण करायचा तो शब्द. ती स्पंदन म्हणजे 'स्वाहा' साक्षात 'अनसूया' थोडक्यात 'स्वाहा' म्हणजे अहंकार, मत्सर न बाळगता भगवंताच्या चरणी पूर्ण समर्पित होणे. 
तर 'स्वधा' म्हणजे आदिमाता जिचे हे अकरावे नाम आहे. ती कशी आहे? तर, स्वतःच स्वतःचा आधार आहे. स्वतःच  स्वतःला धारण करणारी आहे. ती कोण आहे? ती 'स्वधा' आहे आणि 'स्वाहा' पण आहे. 
 मानवाला विजय मिळवायचा असेल तर आधी स्वावलंबी बनलं पाहिजे, स्वयंपूर्ण बनलं पाहिजे (अर्थात self sufficient & self dependent) आणि ते बनायचं असेल तर आधी 'स्वाहा'कार करायला पाहिजे. म्हणजे आधी स्वतःला भगवंताला अहंकार विरहीत होऊन पूर्णपणे समर्पित करायला पाहिजे, म्हणजे काय? तर , स्वतःला अर्पण करायला पाहिजे. सन्यास वगैरे घेण्याची आवश्यकता नाही. माझा भाव कसा पाहिजे? कि, हे भगवंता माझ संपूर्ण जीवन तुझ्या पायाशी वाहिलेल आहे. तुला माझे जे काही करायचं आहे ते तू कर. मी आनंदाने प्रत्येक गोष्टीचा (सुख आणि दु:ख ) स्वीकार करीन. तूच माझा सांभाळ कर. मला मोकळा वेळ मिळेल तेव्हा किंवा मुद्दाम वेळ काढून मी तुझ्या भजनामध्ये, पुजनामध्ये, सेवेमध्ये तो वापरीन. अशा रीतीने भगवंताला स्वतःचा 'स्वाहा'कार केला की, मगच मनुष्याला हि आदिमाता 'स्वधा' प्राप्त होते आणि मगच तो स्वावलंबी व स्वयंपूर्ण होतो.
'स्वधासा अंजना' जी स्वधा आहे तीच सदैव अंजना आहे. 'स्वधासा अंजना'

परमात्म्याला प्रकट करणाऱ्या दोन शक्ती :
१. अंजना शक्ती
२. व्यंजना शक्ती 
जेव्हा भगवंत (सदगुरु ) भावारुपाने येतो, आपल्या नकळतच येऊन मदत करतो ती 'व्यंजना शक्ती' आणि जेव्हा सदगुरु प्रकट रूपाने येतो ती 'अंजना शक्ती'.
अंजना शक्तीचा पुत्र म्हणजे महाप्राण हनुमंत, जो थोरला पुत्र आहे अर्थात सदगुरु दत्तात्रेय.
अनसूया हि स्वाहा आहे व अंजनी हि स्वधा दोन्ही एकच.
हा 'स्वाहा'कार (पूर्णसमर्पण ) व 'स्वधा'कार (पूर्ण स्वावलंबन, स्वयंपूर्णता) कोण  देऊ शकतो? तर, ज्यांनी हे दोन्ही गुण धारण केले आहेत तो व जो आदिमाता अंजनेचा (स्वधाचा) पुत्र आहे तो हनुमंत.
म्हणून आम्हाला 'स्वधा'कार प्राप्त करून घ्यायचा असेल तर आम्हाला पहिल्यांदा- "ॐ हरीमर्कटाय स्वाहा "  हा मंत्र म्हणायला पाहिजे. हा श्रेष्ठ मंत्र अतिशय पूर्वापार प्रचलित आहे. पण 'स्वाहा'कार आणि 'स्वधा'काराच कार्य श्रद्धावानांसाठी श्री वरदा चंडिका प्रसन्नोत्सवापासून अर्थात आदिमाता श्री महिषासुरमर्दिनीच्या स्थापना दिवसापासून सुरु झाले आहे.
"ॐ हरीमर्कटाय स्वाहा " ह्या मंत्राचे महात्म्य वर्णन करताना ऋषी आपल्याला स्पष्टपणे सांगतात कि,
"ॐ हरिमर्कट मर्कट मंत्रमिदं ,परिलिख्यती लिख्यती वामतले , 
    यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं ,यदि मुन्चति मुन्चति वामलता "
"ॐ हरीमर्कटाय स्वाहा " जो कोणी हा मंत्र हनुमंताच्या डाव्या पायाच्या खाली लिहील त्याच्या (लिहिणाऱ्याच्या) शत्रूंचा आणि वामलतेचा नाश होईल. वामलता म्हणजे काय? तर कळीचा प्रभाव आणि शनीची दशा. अर्थात साडेसाती, शनीची दशा आणि कळीचा प्रभाव ह्यांची एकत्रित झालेली गुंफण म्हणजे वामलता. माझ्या शत्रूंचा आणि वामलतेचा नाश करण्याचे सामर्थ्य जे आहे तो मंत्र म्हणजे "ॐ हरीमर्कटाय स्वाहा "


अंजनामाता  वही मला कस सहाय्य करते?
  1. ज्या क्षणी आपल्याला वाटतंय कि आपल मत कमकुवत बनलंय, आपल्या भीती घेरतेय त्याच क्षणाला अंजना मातेच्या आणि तिच्या पुत्राच्या आश्रयाला गेल्याने आपण निर्भर बनतो. सदगुरू कृपेने  मनः सामर्थ्य  मिळते.
  2. आपल्या पतीमधील दुर्गुण कमी करायचे आहेत, तशी पत्नीची इच्छा असेल तर पत्नीने अंजनामाता  वही लिहावी व पत्नीमधील दुर्गुण कमी व्हावे अशी पतीची इच्छा असेल तर पतीने अंजनामाता वही लिहावी. हनुमंत मधुफल वाटिकेतील फळे द्यायला सज्ज आहेच. त्याने दोघांत सुसंवाद सुरु होईल.
  3. प्रत्येक मानवामध्ये दहा चांगले गुण आहेत व दहा दोष आहेत. ते दहा दोष कमी करण्यासाठी अंजनामाता वहीचा आश्रय घ्यावा. मग "और देवता चित्त न धरही, हनुमत सेई सर्व सुख करही" ह्याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही, कारण वामलतेला नष्ट करण्याच कार्य हनुमंत करतो. वामलता मनुष्याला अकरा दिशांनी बांधते. अकरावी मनाची दिशा त्याचा स्वामी हनुमंत आहे त्या वामलतेला तोडण्यासाठी सदगुरू कृपेच बळ लागत ते बळ अंजनामाता वहीच्या माध्यमाने प्राप्त होते.
  4. जे अविवाहित आहेत किंवा ज्याची पत्नी किंवा जिचा पती हयात नाही त्यानाही हि वही अत्यंत लाभदायी आहे कारण अंजनामाता वही लिहिण्याने एकट्याने जगण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.  त्यांना कोणावर अवलंबून राहायची आवश्यकता उरणार नाही. कारण अंजनामाता वही लिहिल्याने स्वधा शक्तीचा स्त्रोत सदगुरू कृपेने अखंड सुरु राहतो.
 त्या सदगुरू श्री अनिरुद्धाना प्रार्थना करूया की, हे सदगुरूराया अनिरुद्धा तुझ्या कृपेनेच आम्हाला वामलता तोडणारी अंजनामाता वही प्राप्त झाली आहे. आम्हासाठी तूच 'स्वाहा' आणि 'स्वधा' आहेस म्हणून आमच्या जीवनात तूच 'स्वधा'कार (स्वावलंबन) आणू शकतो. म्हणून हे गुरुराया तू आम्हाला नित्य तुझ्याच प्रकाशात . हीच तुझ्या चरणी प्रार्थना.







Thursday, June 16, 2011

महामंत्र पठण

ll हरि ॐ ll

परमात्म्याच्या राजीव लोचानांकडे बघत बघत जो कोणी खालील महामंत्र १०८ वेळा १०८ दिवस म्हणेल त्याला उचित काम करण्यासाठी लागणारं सामर्थ्य प्राप्त होतेच.
श्रद्धावानांनो सद्गुरूचे हे वाचन आपल्या जीवनात प्रत्यक्ष आणून उचित कार्यासाठी सद्गुरूचे सामर्थ्य मिळवूया.
- महामंत्र -
राजीवलोचनः रामो कृपादृष्टी प्रक्षेपणेन हि l
ददाति सामर्थ्यमतुलं तदात्वे सर्वयोधिभ्यः l
ॐ परमेष्ठिने वत्सिने नमः ll



अर्थ- श्रीराम सर्व वानर सेनेचे अवलोकन करतात  व आपल्या राजीव नयनांनी (म्हणजे कामळासारख्या)  केवळ कृपादृष्टीक्षेपाद्वारे सर्व योध्यांना अतुलनीय सामर्थ्य प्रदान करतात.
                 महासंकटमोचन   महापापनिवारक  दिव्यप्रकाश आराधनाज्योती मधील आपल्या जीवनात सामार्थ्यारूपी प्रकाश आणणारी ही ५२वी आराधनाज्योती.
                 जे सामर्थ्य उचित कार्यासाठी वापरायचे आहे ते सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी हा महामंत्र मानला जातो म्हणून ते सामर्थ्य मिळविण्याचा सोपा मार्ग सदगुरू श्री अनिरुद्ध ह्या महामंत्राद्वारे श्रद्धावानांना दिग्दर्शीत करीत आहेत. तो मार्ग म्हणजे परमात्म्याच्या राजीव लोचानांकडे (डोळ्यांकडे ) अत्यंत प्रेमाने बघत बघत जो कोणी ह्या मंत्राचे दररोज १०८ वेळा असे १०८ दिवस पठाण करील त्याला उचित कार्यासाठी जे जे सामर्थ्य वापरायचे आहे ते ते सर्व सामर्थ्य त्याला ह्या महामंत्राच्या पठणाने प्राप्त होतेच. परंतु ज्या रुपाकडे बघून मी हा महामंत्र ते रूप परमात्म्याचच असलं पाहिजे. राजीव लोचन म्हणजे काय? तर ज्याच्या पापण्या डोळे उघडे केल्यानंतरही एकतृतीयांश बाहेरच राहतात ते राजीव लोचन होय. त्यामुळे डोळ्यांना कमळाच्या पाकळीचा आकार प्राप्त होतो . चित्रामध्ये तो राजीव लोचानच असावा लागतो. राजीव लोचन हे त्याच्या कृपादृष्टीचं साधन आहे. अशा भक्तवत्सल परमात्म्याला मी नमस्कार करतो. म्हणून ह्या महामंत्राच्या पुढे ॐ परमेष्ठिने वत्सिने नमः l 
असे जोडले आहे.
                  ह्या महामंत्राचं महात्म्यं आम्हाला ध्यानात ठेवलं पाहिजे. आम्ही उभे राहून म्हणू ,बसून म्हणू,हातात फोटो घेऊन म्हणू ह्या पेक्षा आम्ही तो रोज म्हणू हे महत्वाचे.
                  मला जरी हा मंत्र रोज १०८ वेळा असा १०८ दिवस म्हणता आला नाही तरी चालेल. मात्र दररोज वेळ मिळेल तेव्हा दिवसातून ५ वेळा, किंवा ९ वेळा , किंवा ११ वेळा, किंवा १५ वेळा त्याच्या डोळ्यांकडे प्रेमाने बघत बघत म्हटला तरी मला उचित कार्यासाठी जे जे सामर्थ्य हवा ते ते सार तो देणारच. मात्र वाईट हेतूने अनुचित कार्यासाठी सामर्थ्य मिळविण्याच्या हेतूने जर हा मंत्र म्हटला तर त्या पासून कोणतेही सामर्थ्य मिळणार नाही. कारण ' तो ' कसा ? तर " जाणितो वर्म सकळांचे "
            म्हणून आपण सर्वजण सद्गुरू श्री अनिरुद्धांना प्रार्थना करूया की, हे सद्गुरुराया अनिरुद्धा तू आम्हा सर्वांचे जाणतोच आहे. तुझ्या राजीव लोचनांचा कृपाप्रसाद आम्हाला नित्य मनः सामर्थ्याची रसद पुरवितच आहे. आज आम्ही तुझी सर्व लेकरे , तुझ्या चरणी प्रार्थना करतो की, हे सद्गुरुराया अनिरुद्धा,तुझ्या राजीव लोचनांकडे प्रेमाने बघत बघत हि रससाधना आमच्याकडून करून घेण्याची तू बुद्धी दे.
           सद्गुरूचे आपल्याशी अनेक जन्मांचे नाते आहे म्हणून त्याच्या फोटोकडे प्रेमाने बघत बसा, त्याचे रूप न्याहाळा, त्याचा रूप अतिशय प्रेमाने सतत बघावसं वाटलं पाहिजे. त्याचं रूप आपल्याला पिता आलं पाहिजे. त्याला बघून मला आनंद वाटलं पाहिजे. श्रीसाईसच्चरितातील १९व्या अध्यायात श्रीसाईबाबा राधाबाईंना सांगतात की आई तू माझ्याकडे अनन्यपणे पाहा मी हि तुझ्याकडे अनन्यपणे पाहीन. रूप महात्म्य जेवढा अधिक तेवढं नाम महात्म्य ही अधिक, जेवढा नाम महात्म्य अधिक तेवढं गुणसंकीर्तन अधिक चांगले. त्यामुळे त्याचे त्रिगुण कळतात.
              सद्गुरूंच्या वारंवार दर्शनाने माझ्या मनातील मानवत्व वाढीस लागते नामस्मरणाने माझ्या मनातील जनावरे मारली जातात तर गुणसंकीर्तनाने माझ्या प्रगतीचा मार्ग खुला होतो.
               गुणसंकीर्तन म्हणजे सद्गुरूच्या प्रेमाबद्दल बोलणे. म्हणून तितक्याच प्रेमानी सद्गुरू बापूंनी श्रद्धावानांना सांगितले की, आज जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्वांना सांगा , प्रेमाने सांगा. ते सांगताना तुम्ही तुमच्या मनातील सुंदर सूर ऐकाल. तुमचा सद्गुरू नित्य जवळ आहे ह्याचा अनुभव घ्याल. कसा तर All over, Everywhere, Wherever you are . कारण माझा सद्गुरू असाच आहे. तुम्ही मला सद्गुरू मानता तर मला तुमच्या बरोबर असलंच पाहिजे कारण ती माझ्या आई चण्डिकेची  इच्छा आणि माझे आजोबा दत्तगुरूंचा हुकुम आहे. मी तुमच्यासाठी तुमच्याबरोबर नेहमीच आहे. सद्गुरू नाह्मी त्याच्या भक्तांसाठी विश्वासपात्र असतो. सद्गुरू माझा आहे ही भावना घेऊनच आपण पुढच्या जीवनात प्रवेश करणार आहोत.

हे सद्गुरूराया अनिरुद्धा तुझ्याप्रेमाच्या ह्या अमृतकुंभाचा माझ्या हृदयात नित्य अभिषेक होत राहो हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
                                                                    ll हरि ॐ ll